संस्थेची सुरुवात…
Prathana Foundation Morvanchi,Solapur: प्रसाद मोहिते (Prasad Mohite) हा युवक स्वतः एक शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आहे .त्या मुळे वेदनेशी त्याचे अत्यंत जवळचे नाते आहे. माझ्या वाट्याला जे दुःख आल ते इतरांच्या वाट्याला येऊन नये या साठी वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने सर्व आयुष्य समाजासाठी व्यथित करण्याचे ठरवले. आईच्या मदतीने प्रसाद उच्च शिक्षण घेण्यासाठी सोलापूर येथे आल्यावर त्याची ओळख अनु प्रसाद मोहिते (Anu Prasad Mohite) या समाजकार्य विभागाचे शिक्षण असलेल्या मुलीसोबत झाली आणि त्यांनी दोघांनी मिळून भिक्षेकरी, स्थलांतरित, बेघर, निराधार, वंचित मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी “वंचितांची शाळा” हा प्रकल्प सुरु केला.

पुढे जाऊन दोघानी आंतरजातीय विवाह केला. दोघे मिळून मुलासोबतच बेघर लोकांसाठी व इतर ही विविध सामाजिक विषयांवर काम करू लागले. पुढे जाऊन आत्महत्त्याग्रस्त कुटुंबातील मुले, अनाथ, निराधार, वंचित मुलांसाठी निवासी प्रकल्प सुरू करण्यासाठी संस्थात्मक काम उभा राहणे गरजेचे होते त्या साठी एक संस्था स्थापन करण्याचे ठरले. दरम्यानच्या काळात अनु व प्रसाद यांना एक गोंडस मुलगी जन्माला आली तिचे नाव “प्रार्थना” ठेवायचे असे ठरले होते पण दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला व त्यांनी त्या दुःखद प्रसंगातून सावरत त्या चिमुकलीच देहदान करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे जाऊन तिचेच नाव संस्थेला दिले आणि “प्रार्थना फाऊंडेशन” (Prathana Foundation) ची स्थापना झाली

संस्थेचे सेवाक्षेत्र व कार्यउद्दीष्ट्ये | Objectives of Prathana Balgram & Vrudhaashram solapur
- शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, अनाथ, निराधार व वंचित घटकातील मुलांचे पूर्णवेळ संगोपन, त्यांना निवास, भोजन, शाळा इ. सुविधा उपलब्ध करून देणे.
- कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहली यांच्या माध्यमातून मुलांचा व्यक्तिमत्व विकास करणे.
- आत्महत्त्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिला, घटस्फोटीत व निराधार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणे.
- देशाची तरुण पिढी वैचारिक दृष्ट्या सक्षम व्हायला हवी, त्यांच्या मनात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळावे व तरुणाईच्या बौद्धिक व सामाजिक कक्षा रुंदाव्यात या साठी प्रयत्न करणे.
- रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या, स्थलांतरित, बालमजूर , बालगुन्हेगार, शाळाबाह्य, बेघर मुलांना शिक्षण मिळावे व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे या साठी प्रयत्न करणे.
- राज्यभरातील तरुणाईला एक सामाजिक विचारांचे खुले व्यासपीठ मिळावे, त्यांच्या आत दडलेल्या सामाजिक विचारांना कृतीत उतरवण्यासाठी कृतिशील तरुणाई शिबिर च्या माध्यमातून प्रयत्न करणे.
- रस्त्यावर राहणाऱ्या बेघर, अनाथ, निराधार आजी आजोबांच्या पुनर्वसनासाठी त्यांना हक्काचे घर उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करणे.

रंगपंचमी निम्मित “रंग संस्कार” चे आयोजन
प्रार्थना फाउंडेशन, सोलापूर येथील बालग्राम आणि वृद्धाश्रमामध्ये यंदा रंगपंचमीच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने “रंगसंस्कार” शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रभरातून जवळपास २० तरुण या विशेष शिबिरात सहभागी झाले होते. रंगांची उधळण आणि आनंदाची पर्वणी यावेळी साजरी झाली.शिबिराच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमात विविध रंगीत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी आणि आजी-आजोबांनी एकत्र येत रंगांनी खेळत एकमेकांना रंग लावले. रंगांची उधळण करत सर्वांनी मिळून डान्स केला आणि मनसोक्त आनंद लुटला.

या उपक्रमामध्ये तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, तसेच वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनाही यामध्ये सहभागी करून घेत एक संस्मरणीय क्षण अनुभवला.
सामाजिक ऐक्याचा अनोखा अनुभव या रंगसंस्कार शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे पिढ्यांमधील अंतर मिटवणे आणि सणाचा खरा आनंद सर्वांसोबत वाटून घेणे. बालग्राममधील निराधार मुले आणि वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत रंगपंचमी साजरी करत तरुणांनी एक सामाजिक बांधिलकी जपली. या आनंदसोहळ्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि मन भरून आलं.
पुढच्या वर्षीही या आनंदसोहळ्यात सहभागी व्हा!
ही कल्पना यंदा प्रथमच राबवली गेली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुढील वर्षी अधिकाधिक लोकांनी या रंगसंस्कार शिबिरात सहभागी व्हावे, अशी आयोजकांची मनापासून विनंती आहे. रंगांचा हा उत्सव केवळ मजा आणि मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो एक सामाजिक उपक्रम म्हणूनही प्रेरणादायी ठरतो.चला, पुढच्या वर्षी प्रार्थना फाउंडेशन, सोलापूर येथे येऊन या रंगसंस्कारात सहभागी होऊया आणि आनंदाची रंगत वाढवूया!
संस्थेचे विविध उपक्रम:
प्रार्थना बालग्राम | Prathana Balgram & Vrudhaashram solapur
प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, अनाथ, निराधार, स्थलांतरित, बेघर, निराधार व वंचित मुलांसाठी प्रार्थना बालग्राम हा निवासी प्रकल्प चालवला जातो. कित्तेक शेतकरी आज कर्जबाजारीपणा मुळे आत्महत्या करत आहेत त्या मुळे त्याच्या पश्चात कुटुंबाचे प्रचंड हाल होत आहेत. मुलांचे शिक्षण थांबले जाते जो शेतकरी संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याच्या मुलांना शिक्षण मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून त्या कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळावे तसेच कित्तेक मूल अनाथ आहेत त्यांना शिक्षण मिळत नाही, कित्तेक मुलं वंचित आहेत, निराधार आहेत म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना बालग्राम ची सुरुवात. करण्यात आली

वंचीतांची शाळा | Vanchitanchi Shala Solapur
स्थलांतरित/भटक्या, भिक्षा मागणाऱ्या, फुटपाथवर राहणाऱ्या, शाळेत न जाणाऱ्या, बालकामगार, बालमजूर मुलांसाठी वंचतांची शाळा एक पाऊल प्रगतीकडे हा प्रकल्प चालवला जातो या प्रकल्पाच्या माध्यमातून या मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांना खेळाच्या माध्यमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो, त्यांच्यासाठी संस्कारवर्ग घेतले जातात, मुलांच्या सहली काढल्या जातात, त्यांना विविध टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे ट्रेणींग दिले जाते….

मनोबल | Manobal Project Prathana Balgram & Vrudhaashram
रस्त्यावर राहणाऱ्या बेघर व मानसिक रुग्णांसाठी मनोबल हा प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून चालवला जातो. अश्या लोकांसोबत जाऊन त्यांना बोलत करण्याचा त्यांचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. कित्तेक लोक आजारी अवस्थेत पडलेले असतात त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले जाते. कित्तेक बेघर लोकांचा अपघात झालेला असतो पण त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, उपचार न मिळाल्यामुळे त्या जखमांमध्ये आळ्या किडे पडून ते मरण यातना सोसत असतात अश्या लोकांना उपचारासाठी दाखल करून त्यांचा जीव वाचवला जातो.

कृतिशील तरुणाई संवाद व शिबीर | Krutishil Tarunai Sanvad & Shibir
तरुणांसाठी कृतिशील तरुणाई संवाद या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणाईच्या मनात पडणारे विविध प्रश्नांवर व विषयांवर सवांद सत्र भरवले जाते, या संवादाच्या माध्यमातून तरुणाईमध्ये मुक्त चर्चासत्र भरवले जाते. त्यांच्या मनात पडलेल्या प्रश्नांना खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले जातेराज्यभरातील मुलांच्या मनात सामाजिक जाणिव निर्माण होण्यासाठी कृतिशील तरुणाई शिबीर राबवले जाते. शिबिरात राज्यभरातून समाजभान जपणारी मूल-मुली सहभागी होतात. समाजातील विविध सामाजिक कार्यकर्ते मुलांना मार्गदर्शन करतात व त्यांना “स्व” ची ओळख करून देतात.या पाच दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये मुलं विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतात, विविध सामाजिक समस्यांवर चर्चा करतात व ही ज्ञानाची शिदोरी सोबत घेऊन आपवल्या भागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न ते करतात. मुलांमध्ये सामाजिक भान यावं, तरुणाई सामाजिक क्षेत्राकडे वळावी व त्यांच्या हातून समाजकार्य घडावे या साठी हे निवासी शिबीर राबवले जाते..

भिक्षामुक्ती अभियान
भिक्षा मागणाऱ्या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी भिक्षामुक्ती अभियान राबवले जाते. आज कित्तेक मूल शाळा सोडून रस्त्यावर भीक मागताना दिसतात. त्यांना आपण सहानुभूती म्हणून काही भीक देतो पण आपणच त्यांना या विळाख्यात ओढत आहोत मूल शिकली पाहिजे व त्यांना ही समाजात स्थान मिळायला पाहिजे म्हणून संस्थेच्या माध्यमातून भिक्षामुक्ती अभियान राबवले जाते. या अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली जाते की मुलांना भीक देऊन दुर्बल बनवण्यापेक्षा शिक्षण देऊन स्वावलंबी बनवा. मुलांना भीक न देता त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना शिक्षण देणे व शिक्षणासाठी मदत करणे गरजेचे आहे ही जनजागृती केली जाते

आज कित्तेक आजी आजोबा कोणताच आधार नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला दयनीय अवस्थेत स्वतःच्या शेवटच्या घटका मोजत आहेत. तर काही जणांना सर्वजण असून देखील घरातून हाकलून दिल्याने वृद्धापकाळात मरणयातना सोसाव्या लागत आहेत. ज्या वयात मुलाच्या, नातवाच्या प्रेमाच्या सहवासात उरलेलं आयुष्य आनंदात खाऊन पिऊन सुखात घालवायचे त्याच ठिकाणी कुणीतरी भीक म्हणून दिलेल्या दोन घासावर जीवनाची शेवटची घटका मोजावी लागत आहे. अश्याच बेघर आजी आजोबांच पुढचं आयुष्य सुखकर व आनंदात जावं या साठी त्यांच्या पुनर्वसन व संगोपनासाठी संस्थेच्या माध्यमातून वृद्धाश्रम सुरू करण्यात येणार आहे.
आपली छोटीशी मदत…
प्रार्थना फाऊंडेशन ही नोंदणीकृत संस्था आहे. सस्थेला कुठलेही अनुदान नाही तरी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या सहयोगाची आवश्यकता आहे आपण आर्थिक, अन्नधान्य, वस्तु, शैक्षणिक साहित्य इत्यादी सहयोगातुन संस्थस मदत करू शकता आपण आपली मदत Prathana Foundation या नावाने धनादेश, डी.डी. अथवा बँक खात्यावर ऑनलाईन जमा करू शकता – कृपया देणगी जमा केल्यानंतर आपले नाव, पत्ता संपर्क नंबर ईमेलद्वारे संस्थेला कळवावे. आपण दिलेल्या देणगीची पावती आपणास पाठवली जाईल. (80G अंतर्गत कर सवलतीस पात्र )
संस्थेच्या प्रार्थना बालग्राम व वृद्धाश्रम उभारणीसाठी आपण आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत करु शकता अथवा आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ एक खोली बांधून देऊ शकता. आपण दान दिलेला एक रुपया सुद्धा आश्रम उभारणीसाठी लाख मोलाचा आहे..!
आपण आपली मदत खालील बँक खात्यात जमा करू शकता. Prathana Foundation Solapur Donation Details
IDBI Bank Vijapur Road, SolapurA/C
Name – Prathana Foundation
A/C No: 0410104000158862,
IFSC No.- IBKL0000410

youtube.com/prathanafoundation
Prathana Foundation Solapur Address
